पावसाळ्यात संसर्ग टाळण्यासाठी काय करावे? | What to do to prevent infection in the rainy season

पावसाळ्यात संसर्ग टाळण्यासाठी काय करावे? | What to do to prevent infection in the rainy season in Marathi

पावसाचा थंड पाऊस पडून झाल्यानंतरही काही दोष आणि नकारात्मक प्रभाव मागे राहतात ज्यापासून आपल्याला स्वतःचे संरक्षण करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात देखिल काही जोखीमीचे आजार होतात ज्यापासून लोकांना खरोखर काळजी घेणे आवश्यक आहे. जर घरामध्ये मुले आणि वृद्ध लोक असतील तर त्यांची एलर्जी, खोकला, कोल्ड इ. सारख्या आजारांपासून खूप काळजी घ्यावी. आर्द्रता आणि तापमान कमी करण्यासह, हा मानसून आपल्या सोबत अनेक समस्या देखील आणतो. या काळात अनेक रोग व संक्रमण पसरण्याचा सतत धोका आहे.

पावसाळी समस्या

पावसाळा, हवा किंवा संपर्कामुळे पसरणाऱ्या अनेक संक्रामक रोगांना आणतो. पावसाळ्यात साधारण सर्दी, पोटाचे आजार, डेंग्यू, टायफॉईड, मलेरिया, आणि कावीळ असे सहजपणे पसरानारे आजर होतात . या हंगामात बुरशी आणि जीवाणूमुळे, अनेक प्रकारच्या त्वचा समस्या देखील जन्माला येतात. पावसाळ्यात मच्छर, दूषित पाणी आणि अन्न यामुळे बऱ्याच प्रकारचे रोग होतात. या लेखात खाली मॉन्सूनमध्ये संक्रमण टाळण्यासाठी उपाययोजना दिले आहेत.

पावसात रोग टाळण्यासाठी उपाय

पावसामध्ये वरीलपैकी काही रोगांचे अस्तित्व न टिकवून ठेवण्याचे एकमेव उपाय हे लसीकरण आहे. याशिवाय, तुम्ही तुमच्या आजूबाजूचे परिसर व्यवस्थित ठेवून रोगापासून दूर राहू शकता.

पावसाळ्यात अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी एक सोपा उपाय म्हणजे साबणाने हात धुणे. दिवसात वेळोवेळी साबणाने हात धुण्याने आपल्याला अनेक आजारापासून दूर राहण्यास मदत होते.

मॉन्सून दरम्यान ताजे अन्न आणि खाद्यपदार्थ वापरणे नेहमी चांगले आहे. फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न ज्याचा रंग, चव किंवा गंधामध्ये बदल झाला असेल अशा अन्नाचा वापर करू नये. या हंगामात रस्त्याच्या कडेला मिळणाऱ्या अन्नाचे ग्रहण करू नये किंवा खुल्या गोष्टी विकत घेऊ नये. या हंगामात कच्चे अन्न किंवा कोशिंबीर कमी वापरणे चांगले.

मान्सूनच्या हंगामात लोकांमध्ये होणा-या मुख्य समस्यांपैकी एक म्हणजे शरीरातील रोग प्रतिकारशक्तीची पातळी कमी होणे. आजकाल, आपण घरच्या उपचारांनी आपली रोग प्रतिकारशक्ती ची पातळी सहजपणे वाढवू शकतो.

या हंगामात लक्षात घेण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कुठले पाणी पितो, याकडे विशेष लक्ष द्यावे. या हंगामात पिण्याचे पाणी स्वच्छ असावे कारण दूषीत पाण्यामुळे शरीरावर अनेक वाईट प्रभाव पडून आजार होण्याचे प्रमाण वाढते. आजारांचे जंतु शरीरात पिलेल्या पाण्यामधून पोहोचतात आणि यकृत संबंधित रोग, जसं की कावीळ होते. पाणी गाळण्याची क्रिया केल्यानंतरही, उकळलेले पाणी पिणे चांगले आहे कारण यामुळे पाण्यामधील जीवाणू नष्ट होतात.

आपल्या घराभोवती कोणत्याही परिस्थितीत पाणी साठवले जाऊ नये याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. जमा झालेले पाण्यात डासांची पैदास होऊंन मलेरिया, चिकनगुनिया, डेंग्यू इत्यादिंसारख्या आजार उद्भवतात. आपल्या त्वचेला डासांपासून सुरक्षित ठेवणे फार महत्वाचे आहे. ओले कपडे, सॉक्स आणि शूज सुखवून व स्वच्छ करूनच पुन्हा वापरणे आवश्यक आहे अन्यथा त्वचेच्या रोगांचे संक्रमण होण्याची शक्यता असते. यासाठी नियमित पणे आंघोळ व हाथ धुवणे गरजेचे आहे.

 

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

Leave a Comment