१.सकाळी उठल्यावर १ ते २ ग्लास ताजे पाणी प्यावे . तसेच दिवसभर भरपूर पाणी प्यावे .
२. सकाळी नियमित किमान एक तास व्यायाम करा .
३. नियमित एक फळ खात जावा .
४. जेवणाच्या वेळा निश्चित कराव्यात व त्याच वेळेत जेवावे .
५. जेवणात पालेभाज्याचे प्रमाण अधिक ठेवावे .
६. दोन्ही वेळेस संतुलित आहार घ्यावा .
७. एकदाच भरपेट खाण्यापेक्षा काही अंतराने तीन-चार वेळा थोडे थोडे खावा .
८. मनावर तणाव न ठेवता सावकाशपणे अन्न खावे .
९. नियमित भोजनात २-३ चपात्या , १ कटोरी भात , १ वाटी दही ,२ प्लेट कोशिंबीर ,१ ग्लास दूध ,मोसमी फळे आदींचा दररोज समावेश करावा
१०. रोजच्या आहारात तळलेले पदार्थ कमी खावा . जेवणात जास्तीत जास्त कोशिंबीर, हिरव्या भाज्या यांना प्राधान्य द्या .
११. नियमितपणे दीर्घ व खोलवर श्वासोच्छवास घ्या जेणेकरून तुमच्या शरीराला नेहमी जास्त ऑक्सिजनमिळेल .
१२. आहारात साखर व मिठाचे प्रमाण नियंत्रित ठेवा.
१३. चहा ,कॉफी,धूम्रपान यांचे सेवन टाळावे .
१४. बटाटे, केळी ,चिक्कू ,साखर ,भात याचे सेवन कमी करा .
१५. रात्री झोपण्याआधी कमीत-कमी तीन तास अगोदर जेवण घ्या .
१६. दिवसभर आनंदी राहा . भरपूर हसा , हास्यविनोद करा . तसेच तणावामध्ये देखील खूप हसा आणि रागावर आवर घाला .
१७. दररोज ६-८ तास नियमितपणे झोप घ्यावी .
● ऋतूनुसार संतुलित आहार :-
थंडीतील आरोग्यदायी आहार :-
गूळ पोळी :: थंडीतला सर्वोत्तम पदार्थ
गूळ शरीरात उष्णता निर्माण करून थंडीपासून संरक्षण देतो .
गूळाची पोळी अधिक चांगल्या रीतीने पचण्यासाठी त्या जोडीला साजूक तुपाचाही उपयोग करू शकतो .
गूळ आणि तीळ हे वात व कफ कमी करणारे पदार्थ आहे
१. थंडीत भूक वाढत असल्याने आहार वाढवा . विविध प्रकारच्या सुप्सचा आहारात समावेश करा .
२. मूग , मसूर ,मटकी ,वाटणा ,चवळी आदी कडधान्याचा वापर वाढवावा .
३. दुधाचे पदार्थ , लोणी ,पनीर ,खरवस आदींचा आहारात समावेश वाढवावा .
४. मोसमी फळे खावीत .तसेच या ऋतूत येणारी फळे म्हणचेच बोरे ,आवळे आदींचे सेवन करा .
५. शरीराला उष्णता देणारे पदार्थ म्हणजेच तिळगुळाची पोळी , बाजरीची भाकरी आदींचा वापर आहारात करावा .
६.कोमट पाणी प्यावे . त्यामुळे आहाराचे पचन योग्य प्रकारे होण्यास मदत होते .
उन्हाळ्यातील आहार :-
१. उन्हाळ्यात आहार कमी प्रमाणातच घ्यावा . उन्हाळ्यात पचनास हलका असा आहार घ्यावा .
२. कोकम सरबत ,माठातील थंड पाणी , लिंबू सरबत ,ताक ,शहाळाचे पाणी ,विविध फळांचे रस इ पेयांचे उन्हाळ्यामध्ये सेवन करणे हितकारक असते .
३. उन्हाळ्यात मसाले अतिप्रमाणात वापरणे टाळावे .
४. उन्हाळ्यामध्ये तूप,ताक,दही,दुध,लस्सी यांचा वापर आहारात करावा .
५. सामान्याआहारातील भात ,भाकरीचा समावेश अधिक करावा .
६. आहारात विविध पालेभाज्यांचा समावेश अधिक प्रमाणत करावा .तसेच गाजर ,बीट ,काकडी आणि कांद्याचे कोशींबर यांचा आहारत समावेश करावा .
७. उन्हाळ्याच्या दिवसात करवंदे ,द्राक्षे ,टरबूज ,कलिंगड , फणस ,आंबे ,डाळींब यासारखी रसदार फळे जास्त प्रमाणात खावीत .
८. उन्हाळ्यात मांसाहारी पदार्थाचे सेवन कमी प्रमाणात करावे .
९. उन्हाळ्यात आईस्क्रीम ,फ्रीज मधील थंड पाणी ,तसेच विविध शीतपिये यांचा ठराविक प्रमाणातच वापर करावा .