– कारणे :
१) उष्णतेची व साधी सर्दी होणे.
२) वातावरणातील बदल.
३) पोट साफ नसणे.
४) वारंवार होणारा कफ.
५) जागरण करणे.
– उपाय :
१) नियमित देशी गाईचे तुप नाकात टाका. किंवा बोटाने लावा. ( रात्री झोपतेवेळी आणि सकाळी उठल्यावर ) हा एक चांगला उपाय आहे.
२) आले + दालचिनी + खडीसाखर + गवती चहा + तुळशीची पाने + काळीमिरी यांचा काढा घ्या.
३) निलगिरी तेल रूमालावर टाकून वास घ्या.
४) सकाळी ७/८ तुळशीची पाने + २/३ काळीमिरी खा.
५) वारंवार गरमच पाणी प्या.
६) आले रस + तुळशीची पाने रस + मध घ्या.
७) आले + गुळ मिक्स करून गोळ्या करा. गरम पाण्यासोबत घ्या.
८) दूध + हळद + खडीसाखर घ्या.
९) २/३ चमचे कांद्याचा रस + तेवढाच मध मिक्स करून खाणे.
१०) रात्री झोपण्यापूर्वी गुळ खा. मात्र पाणी पिऊ नका. सकाळपर्यंत सर्दी गायब होईल.
११) हातापायांच्या बोटांवरी अग्र भाग ( सायनस ) प्रेस करा.
१२) नियमित नाकामध्ये तुप लावून प्राणायाम करा. विशेषतः भस्त्रिका व अनुलोम विलोम जास्त करा. नाकाचे हाड केव्हाच वाढणार नाही.
१३) एकाचवेळी सर्व उपाय करू नका.
१४) वरील कारणे मात्र कमी करा.